दूषित पाणी पूरवठयामुळे विवाहित महिला दगावली

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी नगर परिषद तर्फे होत असलेल्या दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा औचित्याचा झाला असून जीवितहाणीस कारणीभूत ठरला आहे.त्यातच काल रात्री अचानक कामगार नगर रहिवासी एका विवाहित महिलेची पहाटे चार वाजता उलटी हगवण च्या त्रासाने ग्रस्त झाली असता उपचारार्थ शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचार घेऊन सकाळी घरी परतले असता अचानक शरीरातील पाण्याचे क्षार कमी झाल्याने डिहायड्रेशन होऊन पुन्हा प्रकृती बिघडल्याने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेले असता तोवर डॉक्टरने मृत घोषित केले मृतक महिलेचे नाव शबाना खान शईम खान वय 32 वर्षे रा कामगार नगर,कामठी असे आहे..

या घटनेने सर्वांना एकच धक्का बसला असून सर्वत्र दुषित पाण्याचे भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे तर दुसरीकडे डायरिया, अतिसार,डीहायड्रेशन ची रुग्ण संख्या ही वाढीवरच आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा दौरा

Thu Oct 10 , 2024
– विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधतील यवतमाळ :- महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उद्या दि.11 ऑक्टोंबर रोजी यवतमाळच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे. शुक्रवार दि.11 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.30 वाजता यवतमाळ येथे आगमण. सकाळी 11 वाजता शासकीय विश्राम भवन येथे जिल्ह्यातील खासदार, आमदार, विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती, जिल्हास्तरीय अधिकारी यांच्याशी संवाद साधतील. दुपारी 2 वाजता यवतमाळ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com