संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– 23 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
कामठी :- शेतकऱ्यांच्या शेतातील ई पीक पाहणी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत होती.मात्र शेतकरी ई पीक पाहणी नोंदणी पासून वंचीत राहू नये यासाठी शासनाने 23 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. उर्वरीत शेतकऱ्यांनी 23 सप्टेंबर पर्यंत आपल्या शेतातील पिकाची ई पीक पाहणी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार गणेश जगदाडे यांनी केले आहे.
खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीची सुरुवात 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2024 पर्यंत होती परंतु झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी विहित मुदतीत पूर्ण झाली नाही असे निदर्शनास आले आहे. ई पीक पाहणी न केल्यास 2024-25वर्षाचा सातबारा निघणार नाही,कर्ज प्रकरण करता येणार नाही ,पीक विमा मिळणार नाही ,सातबारा क्षेत्र पडीत दिसेल ,सातबारा निगडित योजनांचा लाभ घेता येणार नाही.खरेदी विक्री तसेच अनुदानासाठी अडचणी येऊन पिकांच्या नुकसानीचे ई पंचनामे होणार नाहीत.शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईल वर ई पिक पाहणी डी सी एस 3.0.2 हे ऐप घेऊन शासनाने वाढवून दिलेल्या मुदतीत आपल्या पिकांची 23 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करावी .