संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागिल 20 जुलै पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कामठी तालुक्याला चांगलाच फटका बसला ज्यामुळे नागरिकांचे जनजिवन विस्कळीत झाले असून कामठी तालुक्यातील कामठी नगर परिषद क्षेत्र,कामठी,कोराडी, महालगाव,तरोडी,वडोदा या मंडळातील 27 गावे बाधित झाले असून तीन हजार च्या जवळपास नागरिकांच्या घरात पाणी शिरले तसेच कामठी मंडळातील चार व तरोडी गावातील 1 असे पाच घरे पूर्णता पडल्याने नुकसान झाले तसेच कामठी शहरातील चार ,कामठी मंडळातील 3 ,कोराडी मंडळातील चार,महालगाव मंडळातील 7,तरोडी मंडळातील 89 तसेच वडोदा मंडळातील चार असे एकूण 111 घरे अंशतः पडले. तसेच शेतामध्ये साचलेल्या पाण्याने पिके पाण्याखाली आले. त्यामुळे 642 हे आर क्षेत्रातील शेतपिकाचे नुकसान झाले ज्यामध्ये भात रोप वाटिका 59 हे आर,भात रोवणी 108 हे आर,सोयाबीन 105 हे आर,कापूस 218 हे आर तर तूर 152 हे आर क्षेत्रातील नुकसान झालेल्या शेतपिकाचा समावेश आहे.
कामठी तालुक्यात मागील काही दिवस पावसाने दडी मारल्या नंतर 20 जुलै पासून आलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा असला तरी काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने अंकुर फुटलेली पिके धोक्यात आली आहेत.या अतिवृष्टीने शेतातील पिके पाण्याखाली आले.