संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
वर्धा :- लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. निवडणुकीत प्रत्येक मताची किंमत असते. त्यामुळे मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांनीही मतदान करावे. जेणेकरून लोकसभा निवडणुकीत योग्य लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी ते आपली भूमिका बजावू शकतील. मतदान हा जनतेचा हक्क आहे. यापासून कोणीही वंचित राहू नये.
तरुणांसह सर्व मतदारांनी आपल्या सदसद्विवेकबुद्धीनुसार मतदान करावे. कारण मतदान करणे हा मतदाराचा स्वतःचा हक्क आहे. जे लोकशाहीसाठीही आवश्यक आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले तरुण मतदार अजूनही हेल्पलाइन अर्जाद्वारे मतदान करू शकतात. तरुणाई ही देशाची ओळख आहे. तुमच्या ओळखीची अमिट छाप सोडण्यासाठी मतदान आवश्यक आहे. याशिवाय तरुणांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही मतदान करण्यासाठी जागरूक केले पाहिजे.
भारत हा लोकशाही देश आहे. लोकशाहीचा आधार मतदार हाच असतो. मतदान हा आपल्या सर्वांचा संवैधानिक अधिकार आहे.मतदारांनी आपल्या मताधिकाराचा वापर करून लोकशाही बळकट करण्यात सहभागी व्हायला पाहिजे. लोकशाहीची पायाभरणी होत असलेल्या या निवडणुकीत प्रत्येक मतदात्यानी मतदानाचा हक्क बजविलापाहिजे.लोकशाहीत सर्व पात्र मतदारांना मतदान करण्याचा अधिकार आहे. मतदारांनी आपल्या मताचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, मतदार आणि सरकारी अधिकारी यांनी आदर्श आचारसंहितेचे १००% पालन केले पाहिजे मतदारांनी कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा गटाची दिशाभूल न करता मुक्तपणे, निःपक्षपातीपणे आणि निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.
आपला उमेदवार , व पक्ष विजयी व्हावा म्हणून राजकीय पक्ष पैशाची खिरापत वाटत असतात. मतदारांना पैशाचे प्रलोभन देतात.अनेक राजकीय पक्ष मतदारांना पैसे, जेवण, मद्य, भेटवस्तू देऊन मत विकत घेण्याचा प्रयत्न करतात. अशी चिरीमिरी स्वीकारत त्यानुसार मत देणाऱ्या अप्रामाणिक मतदाराला त्याच्या राजकीय प्रतिनिधीकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करण्याचा कोणताही हक्क नाही. जोपर्यंत आपण जबाबदारीने मतदान करत नाही, तोपर्यंत आपण समृद्ध होऊ शकत नाही आणि आपल्या आधीच्या पिढीने स्वतंत्र राष्ट्राचे जे स्वप्न पाहिले होते, ते अनुभवू शकत नाही.
मतदारांनी प्रलोभनाला बळी न पडता आपले मत विकू नये. मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय ते आत्मघात ही, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. द्या आपल्या देशात सदन लोक मते विकत घेतात पण मते ही विकण्याची वस्तू नाही ती आपली संरक्षणाची साधनशक्ती आहे मते विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तू आत्मघाती आहे मते विकून नालायकांची खोगीर भरती कायदेमंडळावर केल्याने देशाचे अपरिमित नुकसान होऊन राष्ट्र अधोगतीत जाते स्वतः नालायक व अपात्र असून पैशाच्या जोरावर कायदेमंडळावर जाऊ इच्छिणारे काही लोक तुम्हास द्रव्याचे आम्हीच दाखवतील दारिद्र्यामुळे तुम्हास मते विकावी की काय असा उभा उत्पन्न होईल अशा कोणत्याही मुळा त तुम्ही बिलकुल बळी पडू नका मुळास बडी पडला तर तुम्ही आपल्या पायावर पर्यायाने समाजाच्या पायावर धोंडा मारून घ्याल.ही धोक्याची सूचना बाबासाहेबांनी समस्त देशवासीयांना दिली होती.म्हणून मत विकण्याचे पाप मतदारांनी करू नये,असे भाषण बाबासाहेबांनी एका ऐतिहासीक भाषणात केले होते.धोक्याचा इशारा दिल्यानंतर देखील मतदार पैशाच्या मोहाला बळी पडतात. आज ७० दशके होऊन गेलीत परंतु आपल्या मतदारांना मताचे सामर्थ्य समजले नाही ही खेळाची बाब आहे. आजही केवळ जात धर्म प्रांत बघून उमेदवार दिला जातो व मतदारही जातीधर्माच्याच उमेदवाराला मतदान करतो ही आपल्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीची शोकांतिका आहे. लोकशाहीत, आपण आपले प्रतिनिधी निवडतो. आपण कर भरतो. करापोटी भरलेल्या या पैशातून लोकप्रतिनिधींनी लोकोपयोगी ठरणारी कामे करणे अपेक्षित असते. प्रतिनिधी निवडणारी खरी ताकद आपल्या हातात असूनही आपण भावनांना बळी पडतो आणि तार्किक विचार करत नाही. आपल्या विचारप्रणालीवर प्रामुख्याने भावनांचा पगडा असतो आणि त्यात तर्कशुद्ध विचार केला जात नाही.