कामठी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकांनाना टाळे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- शासनाचे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रास्त भाव दुकानदारांनी 1 जानेवारी पासून संप पुकारला आहे त्यामध्ये कामठी तालुक्यातील समस्त स्वस्त धान्य दुकांनंदारांनी सहभाग घेतल्याने दुकांनाना कुलूप लागले आहे.त्यामुळे या दुकानातुन धान्य वितरण बंद झाले असून सामान्य व गरीब ग्राहकांची पंचायत झाली आहे.

रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी 50 हजार रुपये करा,मार्जिन मनी 300 रुपये करा,टू जी ऐवजी फोर जी मशीन द्या,कालबाह्य नियम बदला,आनंदाचा शिधा कायमस्वरूपी राबवून कांदा, चणाडाळ ,तूरडाळ,मुगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा आदी मागण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.प्रलंबित न्याय हक्क मागण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन आहे.त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांना टाळे लावून संपात सहभागी झाले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सकाळच्या पारी दिसेना वसुदेवाची स्वारी

Sun Jan 7 , 2024
– वासुदेव झाले काळाच्या पडद्याआड,भावी पिढीला वासुदेव इंटरनेटवरच दिसतील कामठी :- डोक्यावर मोरपिसांची निमुळती टोपी ,गळ्यात कवडयाच्या माळा, घोळदार अंगरखा, त्याखाली धोतर,कमरेला शेला त्यात रोवलेले बासरी,हातात पिवळी टाळ, चिपळ्या मुखात अखंड हरिनाम घेत ‘गाव जगवीत आली वासुदेवाची स्वारी’असे म्हणत भल्या सकाळी येऊन धर्म भावना जागरूक करीत गावोगावी होणारी वासुदेवाची स्वारी दिसेनाशी झाली असून हे वासुदेव काळाच्या पडद्याआड गेले असून भावी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!