नागपूर :- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने कामाक्षी नगर व वाठोडा लेआऊट येथे ध्वजारोहण करण्यात आले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहण सोहळा पार पडला.
यावेळी साधना ठोंबरे, विनोद निनावे, डॉ. हरीश राजगिरे, शंकर ढोबळे, वामन ढोमणे,वासनिक, डाबरे, कुबडे, सेवकराव दर्वे, खोब्रागडे, गोपटे, राहुल पाटील, दामोदर धांडे, स्वाती ढोमणे, राऊत, ढोबके, मंगला मिसाळ, इंदुबाई वसू, डॉली निनावे, वर्षा डाबरे, रेखाबेन यादव, येरणे, शेंडे उपस्थित होते.
याप्रसंगी ऍड.धर्मपाल मेश्राम यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. या अमृत महोत्सवी काळात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीतून देशाची सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सुरु असलेली वाटचाल हेच देशाच्या प्रगतीचे द्योतक आहे. आत्मनिर्भर भारत या सारख्या अभिनव संकल्पनेतून महिला, युवा हे स्वयंपूर्ण होत आहेत. मोदीच्या पुढाकाराने आणि नेतृत्वात भारताची आज जगात अमीट छाप पडली आहे, असेही ते म्हणाले.