नवी दिल्ली :-चंदीगढ इथे भारतीय हवाई दलाचे, देशातील पहिले वारसा केंद्र सुरू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
यासंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेले ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्विट केले असून, त्यातल्या आपल्या जोड संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की;
“हा एक स्तुत्य प्रयत्न असून, यामुळे देशाच्या जडणघडणीत आपल्या हवाई दलाने दिलेले समृद्ध योगदान ठळकपणे अधोरेखित होऊ शकेल.”