संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नुकत्याच 18 डिसेंबरला झालेल्या भोवरी ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच,व सदस्यगन हे वेगवेगळ्या पॅनल सह वेगवेगळ्या विचारधारेचे असले तरी आपले वैचारिक मतभेद हे बाजूला सारून उच्च विचारसरणीची कास धरत ग्रामस्थांच्या विश्वासाला कृतीत आणून गावाचा विकास हाच एक ध्यास निश्चय करीत गावविकासाची धुरा सांभाळन्याची कर्तव्यदक्ष भूमिका बजावण्याला प्रारंभ केल्याचे मौलिक मत सरपंच ऋषी भेंडे सह समस्त सदस्यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.
राष्ट्रसंताच्या स्वप्नातील गाव निर्मित करण्याची प्रमुख जवाबदारी ही गावातील सरपंच व सदस्यांची आहे .तर गावाच्या सर्वांगीण विकासात सरपंच व सदस्यांची मोलाची भूमिका ठरते. नवनिर्वाचित सरपंच ऋषी भेंडे ,उपसरपंच देविदास नागतोडे व सदस्य कृष्णा करडभाजने, ओमहरी कोंगे, कोमल सांभारे, पूजा कोंगे, अश्विनी चंदावातके ,रेखा पानतावणे यांनी गावाच्या पालाकत्वाची जवाबदारी आमच्या खांद्यावर आली असून जात,पात, धर्म,पंथ,पक्ष हे सर्व बाजूला सारून फक्त गाव व माझ्या गावातील प्रत्येक माणसाचे कल्याण कसे करता येईल यासाठी प्रयत्नशील आहोत. गावाला पाच वर्षांसाठी समर्पित करून गावाचा विकास साधण्याचा निश्चय केला आहे.
गावात आजही विकासकामांचा बोजवारा कायम आहे.तेव्हा गावात केला जाणारा पाणीपुरवठा, स्वछता, नाले गटारी सफाई,आरोग्य अशा विविध समस्या मार्गी लावण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असून गावात सार्वजनिक शोषखड्डे बांधकाम करणे,प्लास्टिक संकलन केंद्र उभारणे,सौर ऊर्जा लाईट बसवणे ,अशा विविध विकासकामकडे लक्ष वेधले आहे.