दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीतून उद्धव ठाकरे यांची सर्वच राजकीय पक्षांना साद; म्हणाले…

रायगड : रायगडमध्ये जिल्ह्यातील खालापूरजवळ गुरूवारी 20 जुलैला दरड कोसळली. या दरडीखाली अख्ख इर्शाळवाडी गाव दबलं गेलं. अशात आज तिसऱ्या दिवशीही तिथं शोध मोहिम सुरू आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय.

उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीत जात स्थानिकांशी संवाद साधला. त्यांना धीर दिला. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा शब्द दिला. सोबतच सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी एक आवाहन केलं आहे.

दरवर्षी अशा घटना घडत आहे. असं काही घडलं की मग आपण खडबडून जागे होतो. त्यासाठी धावपळ करतो. या घटनेत मी राजकारण करू इच्छित नाही. पण राजकारणी मंडळींसाठी ही लाजीरवाणी बाब आहे. सर्वच पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे. दरड कोसळण्याच्या घटना वारंवार होता कामा नयेत, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारी करणाऱ्या तिन आरोपींना केले जेरबंद

Sat Jul 22 , 2023
– विशेष व्याघ्र संरक्षण दलाची विशेष कामगीरी – वर्षानुवर्षांपासुन होतेय अवैध मासेमारीचा प्रयत्न – १५० किलोच्या मासेमारी जाळ्यासह एक बोट केली जप्त रामटेक :- पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या तोतलाडोह जलाशयात गेल्या कित्येक वर्षापासुन लगतच्या भागातील लोकांकडुन बंदी असतांनाही अवैधरित्या मासेमारीचा निष्फळ प्रयत्न केला जातो व त्यांच्या त्या प्रयत्नाला पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे पथक हानुन पाडत असतात. असाच अवैध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!