खताच्या किंमतीमध्ये वाढ नाही, एमआरपीने खरेदी करावी

यवतमाळ :- खरीप हंगाम २०२४ ला सुरुवात होत आहे. खरीपात शेतकरी मोठ्या प्रमाणात बियाणे व खते खरेदी करतात. सद्या जिल्ह्यामध्ये रासायनिक खताच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याबाबत मोठ्या प्रमाणात विविध माध्यमाद्वारे अफवा पसरत आहे, या अफवा निराधार असून खताच्या किमतीमध्ये वाढ झालेली नाही.

रासायनिक खताच्या दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खताच्या बॅगवरील एमआरपी पाहूनच परवानाधारक कृषी केंद्रातून पक्क्या बिलाद्वारे खतांची खरेदी करावी. कोणत्याही खत विक्रेत्याकडून एमआरपी दरापेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयाकडे रितसर तक्रार नोंदवावी, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अतिक्रमण विरोधात मनपाची मोठी कारवाई

Thu May 16 , 2024
– गोलबाजार,अंचलेश्वर गेट,गिरनार चौक,गांधी चौक,मिलन चौक,अभय टॉकीज परिसरात कारवाई चंद्रपूर  :- शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्या अतिक्रमणधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकची कारवाई सुरूच असुन आज अंचलेश्वर गेट ते गिरनार चौक ते गांधी चौक ते मिलन चौक ते अभय टॉकीज तसेच गोलबाजार येथे फूटपाथ / नालीवरील मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण शहर पोलीस स्टेशन व वाहतूक पोलिस विभागाशी समन्वय साधुन काढण्यात आले. शहरातील विविध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com