आजनीत भटक्या श्वानांची दहशत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील आजनी गावात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांकडून ठिय्या मांडून गावातील लहान, मोठे हल्ला करणे, चावा घेणे, लहान मुलांना ओढत नेणे, भुंकणे यासारखे प्रकार वाढले असल्याने संपूर्ण गावात एक दहशत माजली आहे.

सध्या गावात ग्राम पंचायत निवडणूकीचे वातावरण असून उमेदवार प्रचारासाठी कंबर कसून बसलेले असताना या चावा घेणाऱ्या श्वानांचा मात्र सर्वांनीच धसका घेतला आहे. या श्वानाने मनीषा मिरासे, मयूर चव्हाळे, यांना कडकडून चावा घेतला आहे तर प्रवीण कोळमकर यांच्या मुलाला ओढत नेण्याचा प्रयत्न केला होता. लोकांच्या सतर्कतेमुळे त्यांच्या मुलाचा जीव वाचला.तसेच गुणवंता झलके यांच्या मुलासह गावातील अजून काही नागरिकांवर या भटक्या श्वानाने हल्ला केलेला आहे. शहरातील भटक्या श्वानांचा मुद्दा आज सर्वत्र गाजत असला तरी गाव खेड्यातील या श्वानांचा देखील बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी आजनी गावातील नागरिक करत आहेत. ऐन बाजार चौकातच कितीतरी श्वानांच्या टोळ्या ठाण मांडून बसलेले असतात. अगदी पहाटे पासून उठून शेतीवाडीच्या कामाला जाणारे गावकरी मात्र या श्वानाच्या वाढत्या हल्ल्यांनी भयभीत झाले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

व्यक्तिमत्व विकास हा वाचनातूनच होऊ शकतो -ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वि. स. जोग

Sat Dec 3 , 2022
ग्रंथोत्सवाची चळवळ नियमित राबवणे शासकीय उपक्रम असावा नागपूर :- एकेक ग्रंथ हा मोठा ऊर्जा स्त्रोत असतो. माणसाचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी ग्रंथ आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाने ग्रंथोत्सव ही चळवळ नियमित राबवावी. वाचक, लेखक, प्रकाशक, वितरक, राज्यातील ग्रंथालयाचे भविष्य लक्षात घेता ग्रंथोत्सव शासकीय उपक्रम करावा, अशी सूचना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वि. स. जोग यांनी आज येथे केली. 3 व 4 डिसेंबर रोजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com