मेट्रोच्या मनमानीमुळे अपघाती मृत्युमुखीची संख्या वाढीवर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागपूर जबलपूर महामार्गावरील ऑटोमोटिव्ह चौक ते आशा हॉस्पिटल पर्यंत मेट्रोच्या उडानपूल बांधकामाचे कार्य प्रगतीपथावर कामाला गती देण्यात आली आहे.मात्र या कामादरम्यान या मार्गावरील पथदिवे बंद ठेवल्यामुळे येथील वाहतुकदाराना रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे रस्ता निमुळता झाला असून वाहतूक जोमात सुरू असते त्यातच पथदिवे बंद असल्यामुळे दैनंदिन अपघात होत असतात तर मागील आठ दिवसात अपघाताच्या मोठ्या घटना घडल्या असून काही वाहतुकदारांचा अपघाती मृत्यू झाला आहे.तेव्हा मेट्रोचा हा मनमानी कारभार बंद होत अपघाताच्या घटनांवर आळा बसावा यासाठी या मार्गावरील पथदिवे सुरू करण्यात यावे तसेच जागोजागी योग्य त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावावे या मागणीसाठी खैरी ग्रामपंचायत चे सरपंच योगिता किशोर धांडे, भिलगाव ग्रा प च्या सरपंच भावना फलके यांनी मेट्रो नागपूर चे प्रबंधक तसेच नॅशनल हायवे नागपूर चे कार्यकारी अभियंता यांना निवेदनातून केली आहे.तसेच ही मागणी पूर्ण होत पथदिवे सुरू करण्यासह इतर सुरक्षात्मक दृष्टिकोनातुन उपाययोजना न केल्यास जण आंदोलन उभारण्यात येईल असा ईशारा देण्यात आला.याप्रसंगी माजी सरपंच किशोर धांडे ,निखिल फलके आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

क्षमते पेक्षा जास्त प्रवासी व विद्यार्थ्यांना वाहुन नेणारे, वाहतुक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या ऑटो चालकांवर वाहतुक विभाग, नागपूर शहर तर्फे कारवाही

Fri Jun 28 , 2024
नागपूर :- शहर अंतर्गत ऑटोचालक क्षमते पेक्षा जास्त प्रवासी वाहुन नेतात व अधिकृत पार्किंग मध्ये ऑटो पार्क न करता वाहतुकीच्या मार्गावर अस्ताव्यस्त उभे करतात तसेच ई-रिक्षा यांना शहरातील मुख्य मार्ग 1) वाडी ते वर्डी, 2) बर्डी ते सी.ए. रोड मार्गे भंडारा रोड (पारडी नाका), 3) बर्डी ते कामठी रोड (जबलपुर रोड), 4) वर्डी ते छत्रपती चौक (वर्धा रोड), 5) संपुर्ण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com