वानर सेना मित्र परिवारातर्फे वार्डस्तरीय स्पर्धेअंतर्गत स्वच्छता मोहीम ३१ ऑक्टोबर प्रवेशाची अंतिम तारीख   

चंद्रपूर : – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन चंद्रपूर शहर ” स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा ” आयोजित केली गेली असुन स्पर्धेअंतर्गत बालाजी वॉर्डमध्ये वानर सेना मित्र परिवारातर्फे वार्डातील नागरिकांतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सदर स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर असुन अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

मनपातर्फे स्पर्धेची घोषणा केल्यानंतर आवाहनाला प्रतिसाद देत वानर सेना मित्र परिवारातर्फे बालाजी वॉर्ड परिसरात मागील काही दिवसांपासुन सदर मोहीम राबविली जात असुन या अंतर्गत बालाजी मंदिर ते बाविस चौक, गणपती मंदिर ते गणपती प्लाजा,बालाजी मंदिर ते शिंपी समाज,बैंक ऑफ बरोड़ा ते विश्वकर्मा चौक ते मुलेवार ते सचिन निंबालकर यांचे घर, पुरातन मंदिर मुरलीधर देवस्थान,अंकुर हॉस्पिटल ते गडला हनुमान मंदिर ते सिध्देश्वर मंदिर ते महादेव मंदिर पर्यंत इत्यादी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. स्पर्धेअंतर्गत आपला परिसर स्वच्छ व सुंदर होण्याची अपेक्षा असल्याचे वानर सेना मित्र परिवाराचे अध्यक्ष गोपाल जोशी यांनी सांगितले.

” माझ्या शहरासाठी माझे योगदान ” या थीमवर वार्डस्तरीय स्पर्धा १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आयोजित केली गेली असुन सदर स्पर्धेत नागरिकांना गट बनवुन सहभागी झाले आहेत होता येत आहे. प्रत्येक गटामध्ये कमीत कमी २५ सदस्य असणे आवश्यक आहे. सौंदर्यीकरण करण्यास मनपा मार्फत झाडे व पेंटिंग कलर (मर्यादित) पुरविण्यात येणार असुन इतर काही साहित्याची आवश्यकता असल्यास जसे सुरक्षा साधने इत्यादी मात्र त्या स्पर्धक गटाला स्वतः करावी लागणार आहे. स्पर्धेसाठी गुणांकन पद्धत निश्चित करण्यात आली असुन कामाच्या तासांवर तसेच कामात दररोज किती व्यक्ती सहभागी होतात यावर त्रयस्थ निरीक्षकांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.

या स्पर्धेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गटांना भरघोस पारितोषिक तसेच ज्या वॉर्ड परिसरातुन प्रवेशिका आली असुन विजेती असेल त्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी दिला जाणार आहे. जसे प्रथम पारितोषिक – १ लक्ष, ट्रॉफी व त्या वार्डासाठी २५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे,द्वितीय पारितोषिक – ७१ हजार,ट्रॉफी व त्या वार्डासाठी १५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे,तृतीय पारितोषिक – ५१ हजार, ट्रॉफी व त्या वार्डासाठी १० लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे विजेते गटांना करता येणार आहे. तसेच टाकाऊपासुन टिकाऊ वस्तु ( Using Waste to Create Best ) बनविणाऱ्या गटांना सुद्धा २१ हजार रोख पारितोषिक दिले जाणार आहे.

स्वयंसेवी संस्था,सामाजीक संस्था,युवक/युवती मंडळे इत्यादी सर्वांना यात सहभागी होता येणार असुन स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यास काही स्थळ मनपातर्फे देण्यात येणार असुन याव्यतिरिक्त इतर स्थळ जसे शहरातील मुख्य चौक, रस्ता दुभाजक, बगीचा, सार्वजनिक ठिकाणे या जागा निवडण्याची मुभा स्पर्धक गटांना राहणार आहे.  https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeF1jcqqWbAjg1VLX3hvjt0QZIAd93GUt3-usmi1FSSvZv49g/viewform?usp=sharing या गुगल लिंकवर माहीती भरुन स्पर्धकांना स्पर्धेत भाग घेता येईल. सदर लिंक मनपाच्या फेसबुक पेजवर सुद्धा उपलब्ध आहे. स्पर्धेत नागरिकांनी आपल्या टीमसह सहभागी होऊन आपल्या शहराच्या सौंदर्यीकरणात योगदान देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठीतील विणकरांना 346 भूखंड केव्हा मिळणार?

Sat Oct 29 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 29: – दारिद्र्याचे चटके सोसत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या कामठी शहरातील हातमाग विणकर बांधवांना हक्काचे घर मिळावे यासाठी राज्याचे तत्कालीन वस्त्रोद्योग आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री मोहम्मद आरिफ नसिम खान यांनी नवीन कामठी भागात 346 भूखंड उपलब्ध करून देण्याचे निर्देश यांनी म्हाडाला दिले होते आज मात्र जवळपास 17 वर्षाचा कालावधी लोटून गेला मात्र या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com