सूर्यदेव काढतात जिल्हा परिषद शाळेतील साचलेले पाणी – श्रावण वाघमारे

– विद्यार्थी डासांमुळे त्रस्त

कोदामेंढी :- येथे गुरुवार दिनांक 28 सप्टेंबरला सायंकाळ सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे गावातील चारही वार्डातील खोलगट भागात पाणी साचलेला होता. गावातील चारही वार्डातील खोलगट भागातील पाणी शुक्रवार व शनिवार पर्यंत गावातील साध्या नाल्या व भूमिगत नाल्यांच्या मार्गाने निघून गेला होता, परंतु जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातील पाणी आज शनिवार दिनांक 28 सप्टेंबरला जसेच्या तसेच असल्यामुळे, याबाबत शाळेच्या शेजारी राहणारे श्रावण वाघमारे यांना विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की शाळेतील पाणी काढण्यासाठी कोणताच मार्ग नसून नेहमीप्रमाणे सूर्यदेव निघाल्यावर येथील पाणी कमी होणार. मागील महिन्यांपासून शाळेत साचलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या वाढल्याने विद्यार्थी त्रस्त असून गेंड्याची कातडी घातलेला संबंधित शिक्षण विभाग, गाव स्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंतच्या शालेय व्यवस्थापन समित्या कुंभकर्णी झोपेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक, शासकीय सेवा व विविध योजनांचा महामेळावा

Mon Sep 30 , 2024
भंडारा :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा व जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 सप्टेंबर, 2024 रोजी मातोश्री सभागृह, तुमसर प्रांगणात कायदेविषयक, शासकीय सेवा व विविध योजनांचा महामेळावा आणि अमलबजावणी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. मार्गदर्शन करताना न्यायमुर्ती अनिल पानसरे म्हणाल्या,दिवसेंदिवस महिलांच्या वाढत्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com