![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
– एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी (ता.१) रेशीमबाग येथील जनरल आवारी चौक परिसरात पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली. वीज बचतीसाठी माजी आमदार तथा माजी महापौर प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात पौर्णिमा दिवस या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. जनरल आवारी परिसरामध्ये ग्रीन व्हिजिलच्या स्वयंसेवकांनी नागरिकांना एक तासासाठी अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन केले.
जनजागृती उपक्रमा दरम्यान ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी बांधवाना, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. या उपक्रमात परिसरातील नागरिकांनीही सहभाग नोंदवित जनजागृती कार्य केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.
ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे, तुषार देशमुख आदींनी जनजागृती केली. त्यांना परिसरातील नागरिक अनिल झोडे, किशोर बागडे, सुधीर घोडेस्वार, मनोज भालेराव, दुर्गेश गुप्ता, वैभव चौधरी, प्रतीक म्हैसवार, मनपाचे प्रकाश रुद्राकार, शेखर पवार, राजू ढेंगे आदींनी सहकार्य केले.