– 2025 ची पहिली मंत्रिमंडळ बैठक आपल्या शेतकऱ्यांची समृद्धी वाढवण्यासाठी समर्पित आहे: पंतप्रधान
नवी दिल्ली :– 2025 या वर्षातील पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमधील महत्त्वाच्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आपले सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
X वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे:
आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. देशाचे पोट भरण्यासाठी कष्ट करणाऱ्या आपल्या सर्व शेतकरी भगिनी आणि बांधवांचा आम्हाला अभिमान आहे. 2025 वर्षातील पहिली मंत्रिमंडळ बैठक आपल्या शेतकऱ्यांची समृद्धी वाढवण्यासाठी समर्पित आहे. यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, त्याचा आनंद आहे.”