![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
कामठी :- छावणी परिषद कामठी अंतर्गत येणाऱ्या गोराबाजार वस्तीचे पुनर्वसन वारेगाव करण्यात येत असून यासंदर्भात विशेष सभेचे आयोजन 9 ऑगस्ट ला आयोजन करण्यात आले आहे.गोराबाजार वासीयांनी या पुनर्वसनाचा तीव्र विरोध करण्यात येत असून आगामी 9 ऑगस्ट च्या सभेत गोराबाजार पुनर्वसनचा विषय हटविण्यात यावा या मागणीचे निवेदन समस्त गोराबाजार वासीयांच्या नेतृत्वात आज तहसीलदार अक्षय पोयाम यांना देण्यात आले.उल्लेखणीत आहे की यासंदर्भात गोराबाजार वस्ती चे पुनर्वसन करण्यात येऊ नये या मागणीसाठी माजी मंत्री व विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाणे,आमदार टेकचंद सावरकर यांना निवेदित करण्यात आले आहे.
याप्रसंगी गोपाल सीरिया, राहुल कनोजिया,प्रमेन्द्र वाही,देवा कनोजिया,सुरेंद्र भुटानी,युगचंद छल्लानी,अशोक राव,संजय कनोजिया,रितेश पाटील ,फिरोज अली,अफरोज शेख,दुर्गा खिचर,सुजित ठाकूर,शंभू खरकबाण,क्रिश मेहरोलिया आदी नागरिकगण मोठ्या संख्येत उपस्थित होते.