शिवजयंतीनिमित्त डॉ. नितीन राऊत यांच्या शिवप्रेमी जनतेला शुभेच्छा!

राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जगभरातील आणि राज्यातील शिवप्रेमी जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत!

आपल्या शुभेच्छा संदेशात ते म्हणतात,

नागपुर – “बहुजन प्रतिपालक,रयतेचा राजा, बळीराजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य करणारे प्रजाहित दक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतो आणि समस्त शिवप्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.

भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली तर तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, शिवरायांची समाधी शोधणारे शेतकरी, महिला तसेच समाज शिक्षित झाला पाहिजे यासाठी आजीवन कष्ट करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, आपल्या संस्थानात बहुजनांना आरक्षण देणारे राजर्षी शाहू महाराज, बहुजनांच्या शिक्षणाचे महत्व जाणून प्रत्यक्ष मदत करणारे बडोदा नरेश सयाजी महाराज, मानवमुक्तीचा लढा तसेच  भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही मानवतावादी, समतावादी विचारांची अखंड अशी साखळी आहे. तथागताने देखील  “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे सूत्रच दिले आहे.

शिवाजीराजांचे सर्वाधिक महत्वाचे गुण म्हणून इतिहासकार तीन गुणांचा उल्लेख करतात ते म्हणजे क्षमता,चारित्र्य आणि संवेदनशीलता!
महाराष्ट्र राज्याची स्थापना होताना तत्कालिन कॉंग्रेस सरकारने शिवरायांच्या प्रेरणेने हे राज्य चालविण्यासाठी महाराष्ट्राची जी राजमुद्रा निश्चित केली त्यावर शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील वाक्ये निवडण्यात आली आहेत.
छत्रपती शिवरायांच्या कालखंडात अठरापगड जाती,धर्माची माणसे होती. यात केवळ हिंदूच नव्हे तर मुसलमान धर्माची माणसेही प्रमुखपदावर होती.
कर्नाटकातील हिजाब प्रकरण बघितले तर आज शिवरायांची भूमिका आठवते. मुस्लीम सुभेदाराच्या सुनेची खण-नारळाने ओटी भरून सन्मानाने सुखरूप परत पाठविणारे शिवराय कुठे आणि
राजकीय लाभासाठी हिजाब घातलेल्या मुलींना शिक्षणास विरोध करणारे कुठे ! सर्वधर्मसमभाव, शेतकरी,बहुजन समाजाचे कल्याण ही नीती अवलंबणारे शिवराय आज पुन्हा जनमानसाला समजावून सांगण्याची वेळ आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

नांदेड़ जिल्ह्यच्या भूमिपुत्राचा दिल्लीत सन्मान ओबीसी सेलच्या राष्ट्रीय समन्वयक पदी प्रमिल नाईक यांची निवड़

Sat Feb 19 , 2022
नांदेड़ –  अविकसित भाग म्हणून ओळख असलेल्या मराठवाड़याच्या मातीतिल पोर दिल्ली दरबारात आपल आढळ स्थान  बनवू शकतात असे अनेक वेळा सिद्ध झाले असून त्यात भर म्हणून किनवट/माहुर भागातील भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे युवा नेतृत्व प्रमिल विठ्ठलराव नाईक यांच्या  कांग्रेस संगठनामधील समर्पित कार्याची दखल 24अकबर रोड वरील राष्ट्रीय कांग्रेसच्या मुख्यालयाने घेतली असून पक्ष प्रमुख सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार प्रमिल नाईक यांची निवड़ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com