नेरी च्या ऍड. दादासाहेब कुंभारे विद्यालयात रक्षाबंधन साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- रक्षाबंधन सणाचे औचित्य साधुन 22 ऑगस्ट ला ऍडव्होकेट दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी येथे रक्षाबंधनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला सोबतच वृक्षाला सुद्धा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राखी बांधण्यात आली.

या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अफजल मेहंदी यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना राखीची भेट म्हणून शालेय बॅगचे वितरण केले व मिठाईचे वाटप केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हिंदुस्तान पेट्रोलियम नेरीचे संचालक अफजल मेहंदी तसेच मॅनेजर व माजी विद्यार्थी स्वप्निल डाबरे आणि नेरी ग्रा प च्या सरपंच सुजाता पाटील व उपसरपंच देविदास वंजारी , पोलीस पाटील रूपाली वंजारी, जि प प्राथमीक शाळेच्या मुख्याध्यापिका सरवी ठाकरे , ग्रामपंचायत सदस्य योगेश झोड, सुरज ठोंबरे, शाळेचे माजी विद्यार्थी इंजिनीयर यशवंत वंजारी व नागेश वंजारी उद्योजक ग्रा प सदस्य रूपालीताई जुनघरे, आशा पाटील , कांता मॅडम, जि प प्राथ.शाळेचे प्रशांत मेश्राम,, एडवोकेट दादासाहेब कुंभारे विद्यालय चे मुख्याध्यापक राजेश गजभिये उपस्थित होते. तसेच नवीन पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल चव्हाण, धुळे सह शेळके, अजित बागडे, सुशील तायडे, अरविंद वंजारी, मोतिराम वंजारी, रोशन वंजारी हे सुद्धा याप्रसंगी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन भैयालाल भोयर यांनी केले तर आभार प्रदर्शन अमित चव्हाण यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसहभागातून ग्रामविकास साधता येतो - माजी सरपंच प्रांजल वाघ

Mon Aug 26 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा हा उदात्त हेतू समोर ठेवून पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्र शासनाने अनेक लोककल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या असून गाव परिसराचा कायापालट , विकास करावयाचा असेल तर लोकसहभाग असणे गरजेचे आहे असे आवाहन कढोली ग्रामपंचायत चे माजी सरपंच प्रांजल वाघ यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले. समग्र गावाचा विकास करण्यासाठी शासनाच्या लोककल्याणकारी योजना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!