संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- ‘रमजान ‘च्या.या महिन्यात आपल्या अनुयायांवर अल्लाहची खूप मोठी कृपादृष्टी असते.मुस्लिम समुदायाच्या पवित्र रमजान महिन्याला दोन मार्च पासून सुरुवात झाली आहे .या रमजान महिन्याला ‘बरकती’चा महिना असा सुद्धा संबोधील्या जाते.मनामनातिल दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव,सदभाव वाढवित संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा , प्रामाणिकपणा अशा मानवतेच्या श्रेष्ठ गुणांचे आदर्श निर्माण करणारा हा रमजान महिना असून या पवित्र महिन्याचे श्रद्धेय महत्व जपून येथील मुस्लिम समाजाच्या अनुयायांनी या मार्च महिन्याच्या भर उन्हाळ्यात उपवास धरले आहेत. एकीकडे मार्च महिन्यातच मे महिण्यासारख्या या लखलखत्या उन्हाचा प्रकोप सुरू आहे.अशा उन्हाच्या वातावरणात नागरिकांना वारंवार तहान लागते मात्र या वातावरणात हे मुस्लिम बांधव सहरिपासून ते इफ्तार पर्यंत निव्वळ अन्न पाण्यापासून दूर राहून काही न पिता व काही न खाता पंधरा तासाचा उपवास करीत आहेत. तर हे उपवास मुस्लिम बांधवांसाठी श्रद्धेच्या भावनेतून एक कसोटीच ठरत आहेत.
पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली असून आजचा 16 वा रोजा आहे .मुस्लिम बांधव या रमजान च्या पवित्र महीन्यात सकाळी फजर नमाज, दुपारी जोहर नमाज आणि शेवटी ईशाची नमाज पठण करून 30 दिवस कुरांणचे पठण करतात, या महिन्यात तरावीची नमाज – नमाज पठनाला खूप महत्व असते.यावेळी वर्षभरात अडीच टक्के जकात काढुन गोर गरिबांना वाटप करतात.पवित्र रमजान महिन्यात अनाथ, विधवा महिला व गरजूंना दानधर्म करून पुण्याचे कार्य पार पाडतात.