फेरीवाल्यांच्या आरोग्यासाठी विमा योजना लागू करावी खासदार तुमाने यांची मोदी सरकारकडे मागणी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

नागपूर :- पी एम स्वनिधी योजनेतून देशभरातील फेरीवाल्यांना मदत होत आहे. ही आनंदाची बाब असली तरी फेरीवाल्यांच्या आरोग्यासाठी कर्मचारी विमा योजनेप्रमाणे विमा योजना तयार करण्यात यावी, अशी मागणी खासदार कृपाल दुकाने यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपप्रश्नाच्या माध्यमातून केली आहे.

लोकसभेत खासदार कृपाल तुमाने यांनी सरकारकडून फेरीवाल्यांसाठी आखण्यात आलेल्या योजना व त्याचा मिळालेला लाभ याविषयी प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी उत्तर दिले. पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत देशभरात 38 लाख 77 हजार 724 लाभार्थ्यांना 65 अब्ज 54 कोटी तीन लाख 46 हजार 217 रुपयांचा मदत करण्यात आली आहे. लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रचा क्रमांक असून 4 लाख 14 हजार 32 लाभार्थ्यांना 596 कोटी 13 लाख 22 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

पीएम स्वानिधी योजनेतील कर्जपुरवठा करणाऱ्या 95 टक्के बँका या सार्वजनिक क्षेत्रातील असून खाजगी व को-ऑपरेटिव्ह बँकांसह लहान वित्तीय संस्थांकडून केला जाणारा पुरवठा हा अत्यल्प असल्याचे खासदार तुमाने यांनी हरदीप सिंग पुरी यांच्या लक्षात आणून दिले. सोबतच त्यांना कर्ज पुरवठा सोपा करावा व फेरीवाल्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्यासाठी ईएसआयसीच्या धर्तीवर विमा योजना राबविण्यात यावी अशी मागणी केली. पुरी यांनी खा. तुमाने यांनी उचललेल्या बाबींचे कौतुक केले व त्यावर सरकार सकारात्मक पद्धतीने विचार करून त्यावर तोडगा काढेल असा विश्वास दिला.

तुमने यांनी उचललेल्या प्रश्नामुळे फेरीवाल्यांची व रस्त्याच्या कडेला दुकाने थाटून उदरनिर्वाह करणाऱ्यांना कर्जपुरवठा होण्याच्या संबंधाने तसेच त्यांच्या आरोग्य विम्याच्या विषयाने सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे. फेरीवाल्यांचे जीवन व त्यांचे कुटुंबांना सुरक्षा मिळावी यासाठी विमा योजनेसह कर्ज पुरवठा सोपा व्हावा यासाठी पंतप्रधान मोदींसह मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यासाठी सतत संवाद साधू अशी माहिती खासदार कृपाल तुमाने यांनी दिली आहे..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर विद्यापीठात व्याख्यान संपन्न

Thu Aug 3 , 2023
– रासायनिक तंत्रशास्त्र विभागाचे आयोजन अमरावती :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील रासायनिक तंत्रशास्त्र विभागाच्यावतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 सप्ताहाचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून शिक्षणतज्ज्ञ डॉ. ए. बी. मराठे, विभागप्रमुख डॉ. अनिल नाईक उपस्थित होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, योग्य शिक्षण प्रणालीला प्रोत्साहन देणे जेणेकरुन विद्यार्थ्यांना त्यांच्या आवड आणि अभिरुचीनुसार अभ्यासक्रम, विषय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!