धुळे जिल्ह्यातील गावांत जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील  

   मुंबई : धुळे जिल्ह्यातील गावांमध्ये जलजीवन मिशन मार्फत पाणीपुरवठा करण्यात येत असूनसौरऊर्जेचे पंपही या योजनेअंतर्गत बसविण्यात येतात. स्थानिकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास सौरऊर्जेचे पंप बसवून कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

            विधानसभा सदस्य कुणाल पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील पाणीपुरवठा समस्येबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.

            पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणालेप्रादेशिक पाणीपुरवठा योजना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण नसल्याने त्या पुनर्रुज्जीवीत करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. मात्र जलजीवन मिशन योजनेमार्फत गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या अंतर्गत सौरऊर्जा पंपही लावण्यात येतात. स्थानिकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास सौरऊर्जा पंपाच्या माध्यमातून पाण्याची समस्या कायमस्वरूपी संपुष्टात येतील असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

बोईसर येथील हरवलेल्या विद्यार्थ्यीनीचा तपास गुन्हे शाखेकडे देणार - गृह राज्यमंत्री सतेज पाटील

Fri Dec 24 , 2021
     मुंबई : बोईसर येथील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यीनीचा शोध मुंबई गुन्हे शाखेकडे देणार आहे.या विद्यार्थिनीचा शोध लवकरात लवकर लागावा यासाठी  मुंबई गुन्हे शाखेकडे हे प्रकरण देण्यात येणार आहे अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी एका लक्षवेधीला उत्तर देताना विधानपरिषदेत दिली.            सदस्य डॉ.मनिषा कायंदे यांनी बोईसर येथील एमबीबीएसची विद्यार्थिनी ही परिक्षेसाठी घराबाहेर पडलेली असताना वांद्रे बॅण्ड स्टँडवरुन दिवसाढवळ्या गायब झाल्याचे 29 नोव्हेंबर, 2021 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com