मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– कामठी तालुक्यात रोवणीला आला वेग 

कामठी :- मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने हवालदिल झालेल्या कामठी तालुक्यातील शेतकरी बांधवांना मागील चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाच्या जोरदार सरींनी दिलासा मिळाला आहे.या पावसामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेला कामठी तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला असून रोवणीची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी धावपळीत लागला.

ऐन रोवणीच्या हंगामात पावसाने धोका दिल्याने शेतकरी बांधव चिंतातुर होते.कामठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन व धान पीक व कापूस प्रामुख्याने घेतले जाते. हलक्या धानाच्या परह्याची मुदत होत आल्याने शेतकरी चिंतेत आहे.आधीच धान खरेदी उशिरा झाल्याने पैसा हाती नसलेल्या शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूनी मरण होते की काय अशी परिस्थिती सुद्धा काही शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे. उशिरा झालेली धान खरेदी , आधीच कर्ज त्यात धानाचे पैसे जमा नाही, शिवाय ऐन हंगामात पावसाची हुलकावणी होती अशा दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांची खूप मोठी दमछाक झाली.

तालुक्यात 50 टक्के रोवणे आटोपले असल्याची माहिती आहे मात्र मागील चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाच्या जोरदार सरीनी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवोत झाल्या आहेत. रोवणी झालेल्या धानपिकाला हा पाऊस संजीवनी ठरला आहे .मात्र उर्वरीत रोवणी पूर्ण होण्यासाठी तरीही दमदार पावसाची आवश्यकता आहे .

  – कामठी तालुक्यात दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसाचे आगमन झाल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा हा काहीसा सुखावला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांना व इतर शेती कामाना वेग दिला आहे.

– चिखलणीसाठी टॅक्टरचा वापर

– चिखलणीसाठी शेतात टॅक्टरचा वापर होत आहे.पूर्वी शेतात पेरणी चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाऱ्यांचा घुमणारा आवाज सोबतच नांगर बैलाची जोडी . मात्र आजच्या आधुनिक काळात ही बैलाकरवी होणारी नांगरनीही थांबली असून त्याऐवजी शेतकरी ‘पावर टिलर’वापराकाडे वळला आहे.पूर्वी शेतकरी म्हटला म्हणजे त्यांच्याकडे असणारे डौलदार बैलांची जोडी लाकडी नांगराचे एक दोन फाळ किंवा औत आणि बैलगाडी असे चित्र जून महिना उजडला की शेतकरी जमीन मशागतीसाठी नांगर लागणाऱ्या दुरुस्ती करणे, नवीन नांगर तयार करणे. एखादा बैल कमी असल्यास बैल शोधणे ,नवीन बैल खरेदी करणे किंवा भाड्याने बैल आणणे नांगरणी चिखलणीसाठी फळीसाठी मजबूत लाकूड शोधणे अशा कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होत असे.पूर्वीच्या काळी शेतकरी लावणी ,नांगरणी ,पेरणी आदी कामासाठी एकमेकांच्या शेतात जाउन मदत करत असत.आता मजुरांची टंचाई व पावसाचा अनियमितपणा त्यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या परीने आपली शेतीची कामे करण्याचा प्रयत्न करतात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी रूपये 7545 कोटींची तरतूद

Wed Jul 24 , 2024
नवी दिल्ली :- वर्ष 2024-25 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर झाला. यात महाराष्ट्रासाठी विविध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रूपये सात हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अर्थसंकलपाचे स्वागत केले असून, या प्रकल्पांमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. संसेदचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी 22 जुलै पासून सुरू झाला आहे. वर्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com