नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्या,तहसीलदारला निवेदन सादर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 22:-कामठी तालुक्यात मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कामठी तालुक्यातील शेतकरी तसेच ग्रामस्थांचे जिवन विस्कळीत झाले असून शेतपिकाना चांगलाच फटका बसला आहे.शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी आहे मात्र या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे धानाचे परे,सोयाबीन,कापूस,भाजीपाला सह इतर पिके खराब झाली आहेत.त्या पिकाचे चांगलेच नुकसान झाले आहेत,नाग नदीचे पाणी पवनगाव,धारगाव, कापसी, घोरपड आदी गावे तसेच कन्हान नदीचे पाणी सोनेगाव गावामध्ये शिरल्याने गावातील घराचे व अन्न धान्याचे चांगलेच नुकसान झाले आहे.त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी या मागणीसाठी माजी मंत्री सुनीलबाबू केदार व माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर,यांच्या मार्गदर्शनार्थ कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कुणाल इटकेलवार यांच्या नेतृत्वात
आज तहसीलदार गणेश जगदाळे यांना सामूहिक निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना प्रामुख्याने सभापती अनिकेत शहाणे, समितीचे संचालक सुधीर शहाणे,माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान,संचालक नंदकिशोर दडमल,माजी सरपंच प्रवीण कुथे,कुणाल शिंगणे,गजेंद्र चौधरी,रोहित इंगोले,हर्षल मारबते,आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

18 वर्षे पूर्ण झालेल्या नवंतदारांची नोंदणी करा - तहसीलदार गणेश जगदाळे

Mon Jul 22 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-1 जुलै रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन कामठी चे तहसिलदार गणेश जगदाळे यांनी केले आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर यावर्षीच्या दुसऱ्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे.1 जुलै रोजी 18 वर्षे पूर्ण केलेले नवमतदाराची मतदार नोंदणी करणे,विधानसभा निवडणूक आधी अद्यावत मतदार यादी तयार करणे याकरिता 25 जुलै ते 20 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com