उत्सवांच्या काळात मिठाई व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा (FSSAI) राज्यांना सतर्कतेचे आदेश

नवी दिल्ली :- उत्सव काळादरम्यान मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता, यात भेसळ होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता असते. यामुळे ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेता, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना उत्पादन आणि विक्रीवर कठोर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

उत्सवांच्या काळातील वाढती मागणी

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या(FSSAI) निर्देशानुसार, उत्सवांच्या काळात मिठाई, फरसाण, दूध आणि दुग्धजन्य उत्पादने जसे की तूप, खोवा आणि पनीर यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढलेल्या मागणीमुळे काही वेळा काही उत्पादक या वस्तुंमध्ये भेसळ करतात.यावर नियंत्रण ठेवण्यासाठी FSSAI ने विशेष देखरेख आणि अंमलबजावणी मोहीमा राबवण्याचे निर्देश दिले आहेत.

विशेष देखरेख आणि उपाययोजना

प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिठाई, फरसाण आणि दुग्धजन्य उत्पादने यांची निर्मिती आणि विक्रीवर काटेकोर देखरेख ठेवावी, असे FSSAI चे निर्देश आहेत. नियमित अंमलबजावणी मोहीमा राबवून संभाव्य भेसळ रोखण्याचे निर्देश दिले आहेत.यासोबतच, ज्या बाजारपेठांमध्ये भेसळीच्या घटना घडण्याची शक्यता आहे, तिथे फूड सेफ्टी ऑन व्हील्स (FSW) युनिट्स तैनात करावेत, असे FSSAI चे निर्देश आहेत. या युनिट्समुळे अन्न सुरक्षा नियमांचे पालन होईल आणि ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळू शकेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार करिता 15 सप्टेंबर 2024 पर्यत मुदत वाढ

Fri Sep 13 , 2024
गडचिरोली :- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारसाठी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी करीत असलेल्या बालकांना बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कारसाठी वैयक्तीक पुरस्कार व संस्थास्तर पुरस्कार दिला जाणार आहे. बाल शक्ती पुरस्कार करिता मुलांचे वय ५ ते १८ वयोगटातील असावे, तसेच शिक्षण, कला, सांस्कृतिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com