कोदामेंढी :- रामटेक – भंडारा रोडच्या मधोमध असणाऱ्या खात रेल्वे फाटकावरील उडान पुलावरून कोणताही गाजावाजा न करता वाहतूक सुरू झाल्याने येथील व परिसरातील चाळीस गावातील भंडारा येथे शिक्षण घेणारे शालेय, महाविद्यालयीन, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, भंडारा जिल्हा रुग्णालयात जाणारे रुग्ण, ग्राहक वर्ग, व्यापारीवर्ग ,चार चाकी व दुचाकी वाहन चालक या सर्वांची रेल्वे गाड्यांच्या आवागमनच्या वेळेत तास, अर्धा तास बंद खात रेल्वे फाटक व तेथील लांबच लांब वाहनांच्या रांगा यांपासून मुक्तता झाल्याने या सगळ्यांनी भारताचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व कामठी मौदा विधानसभाचे तडफदार आमदार टेकचंद सावरकर यांच्यासह महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहे.