नागपूर : सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधीत शेतकऱ्यांनी आपले आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक तत्काळ संबंधित साझ्याच्या तलाठी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधीत झालेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या मदतीचे वाटप पारदर्शकरित्या आणि जलद व्हावे. यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या धर्तीवर ऑनलाईन प्रणाली महा-आयटी कंपनीमार्फत विकसीत करण्यात येत आहे.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
सर्व तहसीलदार व निवासी उपजिल्हाधिकारी यांना लॉगईन आयडी देण्यात येणार असून तहसीलदार यांनी प्रणालीमध्ये शेतीपिकांच्या व शेतीजमीनीच्या नूकसानीपोटी द्यावयाच्या मदतीबाबत लाभार्थ्यांची माहिती भरावयाची आहे. माहितीमध्ये बाधीत शेतकऱ्यांकडून त्यांचा आधार क्रमाक व बँक खात्याच्या खाते क्रमांकाची आवश्यकता आहे