सहाव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक ; विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…

नागपूर दि. २६ डिसेंबर :- बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… राजीनामा द्या राजीनामा द्या ,मुख्यमंत्री राजीनामा द्या… द्या खोके, भूखंड ओके… घेतले खोके माजलेत बोके… कर्नाटक सरकार हाय हाय… मिंथे सरकार हाय हाय… निर्लज्ज सरकार हाय हाय… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… गली गली मे शोर है खोके सरकार चोर है… संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे… धानाला भाव मिळालाच पाहिजे… अशा गगनभेदी घोषणा देत सहाव्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.हिवाळी अधिवेशनाचा आजचा कामकाजाचा सहावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजपण विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धनगर आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करा-हेमंत पाटील

Mon Dec 26 , 2022
शिंदे-फडणवीस सरकारला ‘आयएसी’ अध्यक्षांचे आवाहन मुंबई :-महाराष्ट्रात १ कोटी ८० लाखांहून अधिक संख्येत असलेले धनगर बांधव अजूनही हक्काच्या आरक्षणापासून वंचित आहे.अनुसूचित जातीत (एसटी) धनगर समाजाला ७% आरक्षणाची तरतूद असूनही त्यांना आरक्षणाच्या घटनात्मक अधिकारापासून दूर ठेवण्याचे काम पुर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केले आहे. विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत मुंबई उच्च न्यायालयात आरक्षणाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!