संप मागे घेतल्याबद्दल सरकारी कर्मचार्‍यांचे अभिनंदन! संवादातूनच मार्ग निघतो: फडणवीस

नागपूर :-राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी संप मागे घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संघटना आणि सरकारी कर्मचार्‍यांचे आभार मानले आहेत. संवादातूनच मार्ग निघत असतो आणि तो संवाद आम्ही केला, असेही त्यांनी म्हटले आहे.

नागपूर येथे माध्यम प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली असता ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारी कर्मचार्‍यांनी संप मागे घेतला, ही आनंदाची गोष्ट आहे. आज दुपारी माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली होती. आम्ही कुठलाही अहंभाव न बाळगता सरकारी कर्मचार्‍यांची भूमिका जाणून घेतली. आडमुठी भूमिका कधीच घेतली नाही. सरकारी कर्मचार्‍यांचे हित पाहणारेच आम्ही आहोत. सामाजिक सुरक्षेची भूमिका तत्व म्हणून आम्ही आधीच मान्य केली होती. आता चर्चेचे मुद्दे निश्चित करुन समितीपुढे ते ठेवण्यात आले आहेत. समिती त्यावर निर्णय घेईल. पहिल्या दिवशीपासून आम्ही संवादाचा प्रयत्न करीत होतो. आज त्यांनी संप मागे घेतला, याचा आनंद आहे. समितीला 3 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे, त्यामुळे कालबद्ध वेळेतच समिती आपला अहवाल देईल. मी कर्मचार्‍यांचे अभिनंदन करतो आणि पुढाकार घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचेही विशेष आभार मानतो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मराठमोळ्या थाटात होणार हिंदू नववर्षाचे स्वागत

Tue Mar 21 , 2023
– श्री सिध्दीविनायक सेवा ट्रस्टद्वारे भव्य शोभायात्रा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, गिरीजा ओक यांची उपस्थिती नागपूर :- हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा आनंदाची अपेक्षांची, ध्येय, आकांक्षांची उंच गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा आपल्या नव्या पिढीला कळावी, त्यांच्यात या परंपरेचे बीज रूजावे व त्यांनी ही परंपरा संस्कृती पुढे प्रवाहित करावी या उदात्त हेतून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!