नागपूर :- स्थानिक कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा चौक, नागपूर येथे विद्याथ्र्यांसाठी कीटकनाशके आणि जैव खत यांच्या संश्लेषणावर प्रशिक्षण आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग, मायक्रोबायोलॉजी विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग तसेच महात्मा गांधी इंस्टिट्यूट फॉर रूरल इंडस्ट्रियलायझेशन, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जैव कीटकनाशके आणि जैव खते यांच्या निर्मिती अंतर्गत घटकांचे ज्ञान व अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता. कार्यशाळेत तज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आले. पुढील पिढीला ज्ञान व कौशल्यासह सशक्त बनविणे आणि भविष्यातील शेतीचे महत्व पटवून देणे या मागचा उद्देश होता. एम. गिरी वर्धा येथील सिनियर लॅब असिस्टेंट डॉ. शितल शर्मा आपल्या भाषणात म्हणाल्या जैव किटनाशके आणि जैद सुपिकता यांच्या संश्लेषणाच्या अनुभवाने सकारात्मक शेती पध्दतीचे ज्ञान नव्या पिढीला असणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अमर सेवा मंडळाच्या कोषाध्यक्षा स्मिता वंजारी उपस्थित होत्या. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी, संस्थेचे सचिव तथा आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक यांनी केले. रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. वासुदेव गुरनुले, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वैशाली चर्जन, मायक्रोबायोलॉजी विभागप्रमुख प्रा. मिनल देवळेकर यांनी समन्वयक म्हणून काम केले. डॉ. ममता वाघ, रसायनशास्त्र विभाग आणि डॉ. समिक्षा करबे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. डॉ. रश्मी दुबे, प्रा. आरती घाबेकर, प्रा. दिशा बांगडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विशेष परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे संचालन प्रा. मधुर दहिलकर यांनी केले तर प्रा. समिक्षा करंबे यांनी आभार मानले.