‘स्वप्ननिकेतन’च्या ४८० सदनिकांसाठी संगणकीय सोडत (लॉटरी) जाहीर 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकरणद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मौजा वांजरा, कामठी रोड येथे उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्ननिकेतन’ या प्रकल्पातील ४८० सदनिकांसाठी शनिवारी (ता. २१) रोजी संगणकीय सोडत (लॉटरी) जाहीर करण्यात आली. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णतः पारदर्शक अशा संगणकीय सोडतीची प्रक्रिया पार पडली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, मनपाचे मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, लेखा व वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके, उपायुक्त निर्भय जैन, माहिती व तंत्रज्ञान विभाग संचालक महेश धामेचा, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सदनिकांचे विकासक  गौरव अग्रवाल, इंडस इंड बँकचे विभागीय व्यावास्थ्पक सुनील उकळकर, एनईएमएलचे अक्षय भोसले, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी स्वप्नील लोखंडे, कार्यकारी अभियंता सर्वश्री. सुनील उईके, अजय पाझरे, सुनील उईके, प्रतीक गायकवाड, पुष्पा जोगे, वैजयंती आडे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी संगणकीय सोडत प्रक्रियेद्वारा ज्यांची निवड झाली अशा सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी लवकरात लवकर सदनिकांचे बांधकाम पूर्ण करून, सदर सदनिका त्यांना मालकांना सुपूर्द करू असे सांगितले. तरी ज्यांची निवड झाली अशा सर्वांनी पुढील कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करीत मनपाला सहकार्य करावे असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले.

प्रारंभी मनपाचे मुख्य अभियंता  राजीव गायकवाड यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मौजा वांजरा, कामठी रोड येथे उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्ननिकेतन’ या प्रकल्पाची माहिती देत प्रकल्पाचे २० टक्के कार्य पूर्ण झाले असून, पुढील डिसेंबर पर्यंत संपूर्ण सदनिकांचे कार्य पूर्ण होऊन लाभार्थ्याना राहायला उपलब्ध होतील असे सांगितले. तसेच या सदनिका खरेदी करण्याकरिता ऑनलाईन माध्यमातून मनपाच्या पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले होते. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित ४८० सदनिकांसाठी १८१९ अर्ज प्राप्त झाले असल्याचे सांगितले. याशिवाय पूर्णपणे पारदर्शक अशा संगणकीय सोडतीच्या प्रक्रियेची माहिती देखील राजीव गायकवाड यांनी दिली.

ज्या नागरिकांनी विहित मुदतीत नोंदणी शुल्कासह अर्ज सादर केले आहेत, असे सर्व नागरिकांनी संगणकीय सोडतीसाठी उपस्थित होते. संगणकीय सोडत सुरू करण्यापूर्वी संपूर्ण प्रक्रियेची माहिती असलेली चित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली. तसेच प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सदर करण्यात आले. नंतर मनपाचे माहिती व तंत्रज्ञान विभाग संचालक महेश धामेचा यांच्या हस्ते संगणकीय सोडत प्रक्रियेसाठी लागणारे क्रेडेनशिअलचा बंद लिफाफा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सुपूर्द करण्यात आला.

एनईएमेलचे अक्षय भोसले यांनी या क्रेडेनशिअलद्वारे सोडतीची प्रक्रिया पूर्ण केली. चार फेरीत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, लाभार्थ्यांची यादी व एकत्रित प्रतीक्षा यादी प्रदर्शित करण्यात आली. संगणकीय सोडतीची प्रक्रिया पूर्ण होताच ज्या लाभार्थ्यांना सदनिका प्राप्त झाली अशा सर्वांना नोंदणीकृत मोबाईलवर SMS द्वारे सदनिका माहिती देण्यात आली. निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी व एकत्रित प्रतीक्षा यादी नागपूर महानगरपालिकेच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी व एकत्रित प्रतीक्षा यादी मनपातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कक्षात देखील प्रदर्शित केली जाणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कामठी रोडवरील पिवळी नदी जवळ मौजा वांजरा येथे नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘स्वप्ननिकेतन’ हे ४८० सदनिकांचे प्रकल्प उभारण्यात येत आहे. यामध्ये २८.२१ चौ.मी./३०३.६५ चौ. फुट चटई क्षेत्रफळ असलेले 1BHK सदनिका आहेत. सदनिकेची एकूण बांधकामाची किंमत रु. ११,५१,८४५ (अंदाजीत) एवढी असून प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत शासनातर्फे रु. २,५०,००० रुपये अनुदान असून सदनिकेचे विक्री मूल्य रु. ९,०१,८४५ रूपये आहे. या व्यतीरिक्त इलेक्ट्रीक मिटर, जीएसटी, रजीस्ट्री किंमत, स्टॅम्प डयुटी, सोसायटी डीपॉझीट, ॲग्रीमेंन्ट सेल डीड करीता अतिरिक्त शुल्क अदा करावे लागेल.

प्रकल्पातील ४८० सदनिकांमध्ये ५० टक्के अर्थात २४० सदनिका अराखीव असून १३ टक्के अनुसूचित जाती, ७ टक्के अनुसूचित जमाती, ३० टक्के इतर मागास प्रवर्ग आणि ५ टक्के –समांतर आरक्षण दिव्यांग प्रवर्गाकरिता राखीव आहेत. प्रकल्पामध्ये बाग, कम्यूनिटी हॉल, लॉबी, लिफ्ट सह इतर सुविधाचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

2047 पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित बनविण्याचा संकल्प करुया - नितीन गडकरी

Sat Oct 21 , 2023
– अमृत कलश यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग – 5 हजार अमृत कलश दिल्लीला रवाना होणार नागपूर :- 2047 पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करुया, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. नागपूर जिल्हा प्रशासनामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेचा आज कोराडी येथील सेवानंद विद्यालय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com