सीमा भागातील ८६५ गावांमधील संस्था, संघटनांना बळ देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय करणार

मुंबई :- महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटना यांना मोठं बळ मिळणार आहे. या भागातील ८६५ गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था व संघटनांना देखील मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमा प्रश्नी अलीकडेच सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातील मराठी बांधव आणि संस्था यांना महाराष्ट्राकडून अर्थसहाय देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे (24 नोव्हें) रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारातून राज्यातील विविध संस्था, संघटना यांना अर्थसहाय करण्याची तरतूद आहे. यात सुधारणा करुन नव्या शासन निर्णयात यात सुधारणा करून आता सीमा भागातील ८६५ गावांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री धर्मादाय निधीसाठी पुढील वर्षासाठी म्हणजे 2023-24 करिता १० कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिवणी ( भों. ) जवळ अपघात, तरुणाचा मृत्यु

Sat Nov 26 , 2022
रामटेक :- नागपुर येथे मुलासाठी मुलगी पहायला गेलेल्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथील २८ वर्षीय तरुणाचा चारचाकी वाहन पलटल्याने मृत्यु झाल्याची घटना आज दि. २५ नोव्हेंबर ला रात्री १.३० वाजताच्या सुमारास तुमसर मार्गावरील शिवणी ( भोंडकी ) गावाजवळ घडली. मृतकाचे नाव अतुल जिवनलाल कावरे वय २८ वर्ष रा. गोबरवाही ता. तुमसर असे असुन तो वडील जिवनलाल कावरे व आई जसवंता कावरे यांचेसोबत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com