भक्ती मार्ग हाच सर्वात श्रेष्ठ मार्ग -पंडित आशिषकुमार शर्मा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- जीवनात जो भक्ती करत नसेल त्याचे जीवन व्यर्थ आहे त्यासाठी सर्व सुख जरी असेल तरी त्याला भक्ती मार्गाची जोड लावणे आवश्यक आहे तरच जीवन सार्थकी लागेल.भक्ती करत असताना सुद्धा भरकटत जाऊ नका.भक्ती केल्याने कुटुंबात आनंद व सुसंस्कृत पिढी निर्माण होते म्हणूनच प्रत्येकाने जीवनात कथावाचन करणे गरजेचे आहे असे मत कथा व्यास पंडित आशिष कुमार शर्मा यांनी शितलप्रसाद पटेल व समस्त पटेल कुटुंबियांच्या वतीने यादव नगर येथे आयोजित श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ कार्यक्रमात व्यक्त केले.

या शिवमहापुरान कथा ज्ञानयज्ञ कार्यक्रमाचा शुभारंभ शुक्रवार 6 जानेवारीला करण्यात आला असून 14 जानेवारीला समापन होणार आहे. हे शिवमहापुरान कथा श्रवण करण्यासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थितिती दर्शवित आहेत. तर अनेक भाविक गण आता आध्यत्मिक मार्गाकडे वळू लागल्याचे दिसून येत आहे तसेच यादव नगर परिसरात भक्तिमय वातावरण पसरला असून हर हर महादेवाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर 2025 पर्यंत अपघातमुक्त करण्यास प्राधान्य – जिल्हाधिकारी, रस्ते सुरक्षा सप्ताहाचे उदघाटन

Thu Jan 12 , 2023
नागपूर :– मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याची गरज आहे. यासाठी रस्ते सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. येत्या दोन वर्षात नागपूर जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येणार आहेत. 2025 पर्यंत अपघातमुक्त नागपूर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यास प्राधान्य असेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी आज येथे केले. यदा 11 ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!