अपने अच्छे दिन आयेंगे : खा. देशमुख

यवतमाळ :- आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच खा. संजय देशमुख म्हणाले की, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम केले तर, अपनेभी अच्छे दिन आयेंगे. सातही विधानसभेत आघाडीचेच आमदार निवडून येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पुस्तक प्रकाशन सोहळ्यावर बोलताना ते म्हणाले की, माणिकरावांचा कार्यकाळ संयमी राहीला. सर्वांना न्याय देण्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्नरत राहिले. मात्र सर्वांना न्याय देता येत नाही. त्यात मीही होतो अशी गुगली त्यांनी टाकली. काम करताना कुणाचा अपमान होईल असे शब्द त्यांच्या तोंडून कधी निघत नाही. 20 वर्षांपासून त्यांचे राजकारण मी बघतो आहे. संयमी वृत्तीमुळेच त्यांना देशात नेतृत्व करण्याची संधी मिळाली. यवतमाळच्या इतिहासात त्यांच्याएवढी पदे कुणाला मिळाली नसेल. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी चांगले काम केले. कोणत्याही प्रसंगात त्यांनी पक्षाची साथ सोडली नाही. तसेच दिग्रस, दारव्हा, नेरमध्ये त्यांनी जातधर्माचे राजकारण कधीच केले नाही, असेही देशमुख म्हणाले. छत्रपती शिवरायांचा हवेने पुतळा पडल्याचे सांगितले जाते. मात्र सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार सर्वत्र उघडा पडतो आहे, असा आरोपही त्यांनी केला. सोयाबिनला केवळ 3400 रुपये भाव असल्याने सहा हजार भाव मिळण्यासाठी लवकरच जिल्हा कचेरीवर मोठे जनआंदोलन आघाडी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचनाने मानवी कल्याण - भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा धम्मसंदेश

Fri Aug 30 , 2024
नागपूर :-आंबेडकरी अनुयायांनी शिक्षणात क्रांती घडविली आहे. वाचन आणि लेखन हे समाजासाठी प्रेरणास्रोत ठरले आहे. प्रत्येक घरात बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आहे. मात्र वाचन किती अनुयायी करतात, हा संशोधनाचा विषय आहे. शोभेची वस्तू नाहीत, तर अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवीत असतात. या धम्मग्रंथाने समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग सांगितला आहे. या मार्गावरून जाण्यासाठी प्रत्येकाने बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com