संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
कामठी :-प्रभाग क्र 15 मधील वित्तु बाबा नगर येथील पिण्याच्या पाणीचे पाईपलाईन जोडण्याकरिता नगर परिषद कामठी चे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना माजी नगरसेवक निरज लोणारे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
गेल्या 1 वर्षांपासून वित्तु बाबानगर येथील नागरिक पिण्याच्या पाणी करिता त्रस्त असून अद्याप पाण्याची पाईप लाईन टाकून सुद्धा नगर परिषद कामठी द्वारा जोडली गेली नाही त्यामुळे स्थानिक लोकांना बिकट परिस्थितीतुन जावे लागत आहे त्यावर मुख्यधिकारी यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अवी चौधरी यांना तात्काळ कार्यवाही चे निर्देश दिले यावेळी
निकिता वाघमारे,शहजादी खान,रोमी राठोड,उमा भोंडे, पुष्पकला कंठाने, किशोर शर्मा,रोशनी सतापे, पुष्पा देशभ्रतार, प्रियंका चव्हाण,निर्मला अंबादे,रोशनि , महेश बरोडे,गीता झुराये आदी नागरिक उपस्थित होते.