शेतकरी, कष्टकऱ्यांच्या श्रमाला न्याय देणारा अर्थसंकल्प – ॲड. धर्मपाल मेश्राम

नागपूर :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी, कष्टकऱ्यांच्या श्रमाला न्याय देणारा आहे, अशी प्रतिक्रीया भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गाच्या उत्थानासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल ॲड. मेश्राम यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले.

शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड्सच्या या कर्जाची मर्यादा वाढवून 5 लाख करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देशातील सात कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला सन्मान देऊन विकास साधण्याचा पुढाकार घेतला गेला आहे, असेही ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रजासत्ताक दिन शिबिरात विविध पारितोषिके प्राप्त करणाऱ्या एनसीसी कॅडेट्सचा केला सत्कार

Sun Feb 2 , 2025
– महाराष्ट्र एनसीसी देशात सर्वोत्कृष्ट: राज्यपालांकडून कॅडेट्स ना कौतुकाची थाप मुंबई :- नवी दिल्ली येथे झालेल्या एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये अनेक वैयक्तिक तसेच सांघिक पारितोषिके प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्र एनसीसीच्या कॅडेट्सना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन येथे निमंत्रित करून शाबासकी दिली. महाराष्ट्र एनसीसीने आजवर १७ वेळा प्रतिष्ठित असे पंतप्रधानांचे निशाण पटकावले आहे, अनेकदा राज्य एनसीसी संचालनालय द्वितीय क्रमांकावर आली आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!