संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 16 :- ग्रामीण भागातील जनतेच्या विविध विभागाच्या प्रलंबित प्रश्नांना एकाच छताखाली जलद गतीने न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी ‘प्रशासन आपल्या गावी’ हा उपक्रम ” राबविण्याचे निर्देशित केल्याप्रमाणे आज 16 सप्टेंबर ला कामठी तालुक्यातील कोराडी ग्रामपंचायत येथे तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या अध्यक्षतेखाली व बीडीओ अंशुजा गराटे यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित सभेत तहसीलदार अक्षय पोयाम यांनी तालुकास्तरावरील विविध यंत्रणा अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन नागरिकांच्या विविध अडचणी /समस्या यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने मंडळ स्तरावर एक दिवस शुक्रवारी उपक्रम राबविण्या करिता व नियोजन करण्याकरिता कोराडी मंडळ अंतर्गत गावातील जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य,सर्व विभागाचे अधिकारी,सरपंच,मंडळ अधिकारी, सचिव व तलाठी यांची बैठक घेत प्रशासन आपल्या गावी उपक्रम राबविण्याचे निर्देश तहसीलदार अक्षय पोयाम यांनी दिले.सदर सभेत गट विकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी मार्गदर्शन केले व सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सरपंच यांना आवाहन करण्यात आले .तसेच राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा बाबत पण मार्गदर्शन करण्यात आले.