गोंदिया : ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शहरात शैक्षणिक आधार मिळावा म्हणून ७२ वसतिगृह सुरु करण्याच्या मागणीकरीता जिल्ह्यात आज ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी समन्वय समितीच्या आवाहनावर ओबीसी संघटनांनी, मुख्यमत्री, उपमुख्यमंत्री व ओबीसी बहुजन कल्याण मंत्र्याचे नावे असलेले निवेदन तहसिलदार यांच्या मार्फेत सादर केले. गेल्या 4 वर्षापासून ओबीसी वसतीगृह सुरु करण्याची घोषणा मागच्या राज्य सरकारने केली होती. मात्र शैक्षणिक सत्र सुरु होऊनही वसतिगृहाची घोषणा कागदावरच राहिली आहे.याशिवाय स्वाधार योजनेच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यासाठीची आधार योजनाही बारगळल्याने ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीचा आर्थिक आधारही हिरावला गेला आहे. यापुर्वीच्या युती व मविआ सरकारच्या मुख्यमंत्री, ओबीसी कल्याण मंत्र्यासह सर्वांनाचा याबाबत निवेदने दिली गेली.पण पोकळ घोषणांशिवाय काहीच हालचाली झाल्या नाहीत.त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांच्या होस्टलचा प्रश्न तत्काळ निकाली काढण्यात यावे,या मागणीसाठी आज शनिवार 3 सप्टेबंरला ओबीसी अधिकार मंच,ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,भारतीय पिछडा शोषित संघ,सर्व समाज ओबीसी संघ, जनमोर्चा,ओबीसी जनगणना समन्वय समिती,राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघ आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.
निवेदन देताना खेमेंद्र कटरे,अशोक लंजे,कैलास भेलावे,तिर्थराज उके,सी.पी.बिसेन,सुनिल पटले,रमेश ब्राम्हणकर,सावन डोये,शिशिर कटरे,अतुल सतदेवे, मुकेश शिवहरे,कमल हटवार,सुनिल कावडे,मुनेश्वर कुकडे, पप्पू पटले, प्रेम साटवणे, भुवन रिनायत ,भागचंद रहांगडाले पी.डी.चव्हाण,हरिष मोटघरे ,कपिल बावनथडे , भाष्कर कडव ,जिवनलाल शरणागत ,कैलास शेंडे आकाश वालदे,संतोष भेलावे,विनोद चकोले,योगेश करंजेकर आदी उपस्थित होते.