राज्यपालांच्या उपस्थितीत एचएसएनसी विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारोह संपन्न

– ३८ गुणवत्ताधारक स्नातकांना सुवर्णपदके प्रदान

मुंबई :- शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून पदवी प्राप्त केल्यानंतर देखील जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण सुरूच ठेवले पाहिजे. स्वयंशिस्त, ध्येयासाठी परिश्रम व सातत्य ठेवल्यास यश हे निश्चितपणे मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

एचएसएनसी, मुंबई विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारोह राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या वरळी येथील दीक्षांत सभागृहात गुरुवारी (दि. ९) सपंन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध विद्याशाखांमधील ३८ गुणवत्ताप्राप्त स्नातकांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाला एचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ निरंजन हिरानंदानी, विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला, एचएसएनसी मंडळाचे अध्यक्ष अनिल हरीश, कुलसचिव भगवान बालानी, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ जयेश जोगळेकर, अधिष्ठाता, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, पालक तसेच स्नातक उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ निरंजन हिरानंदानी यांना विद्यापीठाचे पहिले प्रोव्होस्ट म्हणून यशस्वी कार्य केल्याबद्दल मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अतिक्रमण विरोधात कारवाईला गती

Fri Jan 10 , 2025
– पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी केली कारवाईची पाहणी  मनपा व पोलिस विभागाद्वारे संयुक्त कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात सुरु असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईला गती देण्यात आली आहे. मनपा आणि पोलिस प्रशासनाद्वारे संयुक्तरित्या सुरु असलेल्या कार्यवाहीमध्ये गुरुवारी (ता. ९) धरमपेठ, धंतोली, गांधीबाग झोनमधील विविध बाजार भागांमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. गांधीबाग झोनमधील कारवाईदरम्यान पोलिस आयुक्त डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!