ज्याप्रमाणे मविआ सरकार पाडण्यात आले, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्यात आली, या सर्व गोष्टींचा जनतेने निषेध केला – जयंत पाटील

कसब्यातील विजयानंतर शिंदे – फडणवीसांवर जयंत पाटील यांचा हल्लाबोल…

मुंबई  – ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले, ज्याप्रमाणे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्यात आली, या सर्व गोष्टींचा निषेध जनतेने केला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान कसबा येथून भाजपची पकड सुटली आहे, फडणवीस आणि शिंदेंना जनतेने पूर्णपणे नाकारले आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचाच उमेदवार कसबा निवडणुकीत विजयी होत होता याची आठवण करून देतानाच चिंचवड पोटनिवडणूक आमचा भलेही पराभव झाला असला तरी विरोधात पडलेली मते एकत्र केली असती तर भाजपचा तिथेही पराभव झाला असता असेही जयंत पाटील म्हणाले.

फडणवीस – शिंदे यांची जी युती झाली आहे त्याबाबत राज्यातील जनता प्रचंड नाराज आहे हे कसबा निवडणुकीतून समोर आले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यापीठाच्या निसर्गोपचार व योगशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची श्रीहरी सुजोक व निसर्गोपचार केंद्राला भेट

Thu Mar 2 , 2023
– सुजोक चिकित्सेची घेतली माहिती अमरावती –  विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागामधील निसर्गोपचार व योगशास्त्र विभागाच्या विद्याथ्र्यांनी नुकतीच अमरावती शहरातील राजापेठ परिसरातील श्रीहरी सुजोक व निसर्गोपचार केंद्राला भेट दिली. यावेळी केंद्राचे संचालक डॉ. आशीष राठी यांनी विद्याथ्र्यांना सुजोक चिकित्सेबद्दल सविस्तर माहिती दिली व स्माईल मेडिटेशन, कलर थेरपी, सीड्स थेरपी, ट्रायऑक्सीन, मोक्सा, मॅग्नेट्स, मुद्रा अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com