– दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांना अभिवादन
मुंबई :- दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.
राज्यपालांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
“जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची” प्रतिज्ञा राज्यपालांनी यावेळी उपस्थितांना दिली.
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे व सहसचिव श्वेता सिंघल उपस्थित होते.