अमृत महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार येरखेडा ग्रामपंचायतला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अमृत महाआवास अभियान योजनेचा सण 2021–22 राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार कामठी तालुक्यातील येरखेडा ग्रामपंचायतला नुकताच शासनाच्या वतीने प्रदान करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अमृत महाआवास अभियानाची सुरुवात सन 2021- 22 या सत्रात केली असता बहुमजली इमारत अभियानात येरखेडा ग्रामपंचायत ने संपूर्ण राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रथम पुरस्कारासाठी निवड झाली होती यशवंतराव चव्हाण नरिमन पॉईंट मुंबई येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिद्री उपस्थित होते पाहुण्यांचे हस्ते येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच सरिता रंगारी, ग्रामविकास अधिकारी रामेश्वर मानेकर यांनी पुरस्कार स्वीकारला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखविली "विकसित भारत संकल्प रथाला" हिरवी झेंडी

Fri Nov 24 , 2023
– नागपूर शहरातील विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ  नागपूर :- केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने देश पातळीवर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यात शुभारंभ करण्यात आला. शुक्रवार (ता.२४) रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दाभा येथील ऍग्रो व्हिजन प्रदर्शनीच्या मैदानावरून नागपूर शहरातील नागपूर महानगरपालिकेच्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com