पावसामुळे प्रभावीत वस्त्यांतील रहिवाश्यांना सानुग्राह अनुदान द्या ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

नागपूर :- नागपूर शहरातील नाग नदी काठावरील, भांडेवाडी कचरा डम्पिंग परिसर व रिंग रोड च्या खोलगट भागातील रहिवाशी शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे प्रभावित झाले आहेत. या ठिकाणच्या रहिवाशी नागरिकांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले असून उपरोक्त भागातील रहिवाशी नागरिकांना सानुग्रह मदत देण्यात यावी, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.

ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सदर मागणीच्या निवेदनाची प्रत भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना देखील पाठविलेली आहे.

नागपूर शहरातील प्रभाग क्रमांक २६ येथील नाग नदी काठावरील / रिंग रोड खालील / कचरा डम्पिंगमुळे प्रभावीत अशा सर्व वस्त्यांतील रहिवाशांना पावसाळ्यात मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. मौजा वाठोडा परिसरातील पडोळे नगर, न्यू पँथर नगर, हिवरी नगर, शास्त्रीनगर झोपडपट्टी, घरसंसार सोसायटी देवीनगर, न्यू सुरज नगर, सुरज नगर, चांदमारी नगर, संघर्ष नगर झोपडपट्टी, धरती माँ नगर, पवनशक्ती नगर, विश्वशांती नगर, श्रावण नगर, राज नगर, अंतुजी नगर, अब्बुमीया नगर, तुलसी नगर, वैष्णोदेवी नगर, महेश नगर आदी वस्त्यांमधील नागरिकांचे शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले असून अन्नधान्य आणि खाण्या-पिण्याच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. उपरोक्त अशा सर्व खोलगट भागात राहणाऱ्या वस्त्यांमधील नागरिकांचे शासनामार्फत सर्वेक्षण करून त्यांना तातडीने सानुग्रह मदत देण्याचे प्रशासनाला निर्देशित करावे, अशी मागणी देखील ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग कल्याण विभागाचा पूर्व नियोजित दिव्यांग मेळावा स्थगित

Sun Sep 24 , 2023
नागपूर :- जिल्हा प्रशासन, मनपा आणि जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या २५ सप्टेंबर रोजी आयोजित “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” कार्यक्रम नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांनी कळविले आहे. दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीला पूर्वपदावर आणण्यासाठी जिल्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com