पक्षांसाठी पाणी भरलेले मातीचे भांडे ठेवा,मनपातर्फे नागरीकांना आवाहन

नागपूर :- उष्णतेच्या लाटेमुळे पशु- पक्ष्यांना पाणी पिण्याकरिता नागरिकांनी घराच्या छतावर किंवा घराच्या समोरच्या मोकळ्या जागेमध्ये मातीचे भांडे ठेवण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

उन्हाळया मध्ये पशु-पक्षांना पाण्यची टंचाई भासते. त्यामुळे नागरीकांनी त्यांच्या घरासमोरील परिसरात, घराच्या छतावर किंवा बालकनीमध्ये मातीचे भांडयामध्ये पाणी भरुन ठेवावे. नागरीकांनी मोकाट जनावराकरिता ज्यांच्या घरासमोर मुबलक जागा उपलब्ध असल्यास व सदर जागेपासुन वाहतुकीला,रहदारीला अडचण निर्माण होणार नाही अशा ठिकाणी जनावरासाठी पिण्याच्या पाण्याकरिता हौद, टाकीची व्यवस्था करावी. नागरीकांनी उपाययोजना केल्यास उष्माघातामुळे पशु व पक्ष्यांचा उष्माघाताने मृत्यू होणार नाही यासाठी नागपुरातील नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त विजय देशमुख यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

समर्पित भावनेने काम केल्यास विकसित भारताचे लक्ष्य दहा वर्षे अगोदरच साध्य - राज्यपाल सी पी राधाकृष्णन

Wed Mar 26 , 2025
– राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ. होमी भाभा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ  – विद्यापीठांनी वार्षिक वेळापत्रक, पदवीदान समारोहाची तारीख काटेकोरपणे पाळावी मुंबई :- पूर्वीच्या तुलनेत आजच्या विज्ञान तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. युवकांनी या संधींचा लाभ घेत देशासाठी समर्पित भावनेने कार्य केल्यास विकसित भारताचे उद्दिष्ट्य 2047 च्या किमान दहा वर्षे अगोदरच साध्य होईल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!