केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले उत्तर
महागड्या टोलमुळे सर्वसामान्य जनता हैराण आहे, पण खासदार, आमदार टोल का भरत नाहीत? असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जात असतो. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज तकच्या एका कार्यक्रमाता या प्रश्नाला उत्तर दिले. दरम्यान, केंद्र सरकारने आणलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे तब्बल एक वर्षाहून अधिक काळ आंदोलन सुरू असल्याचे केंद्र सरकारचे मोठे नुकसान झाल्याचे सरकारने म्हटले. या आंदोलनामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) तब्बल २७३१.३१ कोटी रुपयांच्या टोलचा तोटा सहन करावा लागला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती गुरुवारी दिली.
“लष्कर, रुग्णवाहिका, ट्रॅक्टरने मालवाहतूक करणारे शेतकरी, खासदार, आमदारांना सरकारने सूट दिली आहे. मात्र प्रत्येकाला सूट देणे योग्य नाही. चांगल्या रस्त्यावर जायचे असेल तर पैसे द्यावे लागतील,” असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. लोक ट्रॅफिकमध्ये अडकायचे, ज्यामुळे पैसे पेट्रोल आणि डिझेलवर वाया जायचे. आता चांगले रस्ते बांधून पैसा वाचतोय, मग त्याऐवजी टोल भरायला काय हरकत आहे? असा सवालही नितीन गडकरी यांनी केला आहे.