आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार दिलाय – जयंत पाटील

मुंबई – भाजपला जशी काही मते कमी पडतात तशी काही मते महाविकास आघाडीला कमी पडतात परंतु आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज दाखल केल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस येईल तेव्हा आपल्या सोबत किती आमदार आहेत याचा विचार सर्वच पक्ष करतील. महाराष्ट्र विधानसभेत कधी घोडेबाजार पाहिला नाही त्यामुळे घोडेबाजार कोण करेल असे वाटत नाही. खास करुन भाजप करणार नाही असे सांगतानाच जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल असेही जयंत पाटील म्हणाले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चंद्रपूर महानगरपालिकेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

Tue May 31 , 2022
चंद्रपूर ३१ मे – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज ३१ मे २०२२ रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिकेत उत्साहाने साजरी करण्यात आली. महानगरपालिका उपायुक्त अशोक गराटे व मुख्यलेखाधिकारी मनोहर बागडे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मनपा कार्यालयातील वैष्णवी रीठे, भूषण ठाकरे,विकास दानव, माधवी दाणी,गुरुदास नवले,अनिल बनकर, संजय बेले, प्रदीप मडावी, विजय भुरकुंडे,संजय चौधरी, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com