आचार्य धर्मेंद्र यांच्या रुपाने समाजाला नवी दिशा देणारा प्रखर धर्माचार्य गमावला- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई :- जयपूरच्या रामदासी मठाचे प्रमुख पू. आचार्य धर्मेंद्र यांच्या निधनाने समाजाला नवीन दिशा देणारा एक प्रखर धर्माचार्य आपण गमावल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आचार्य धर्मेंद्र हे देशातील हिंदू समाजाला नवी दिशा देणाऱ्या धर्माचार्यात प्रमुख होते. त्यांच्या भाषणांमुळे देशभरात एक नवचैतन्य निर्माण झाले. हिंदू समाजात सुधारणा करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. जयपूरच्या रामदासी मठाचे परंपरागत प्रमुख असल्याने त्यांचे महाराष्ट्राशी एक वेगळेच भावूक नाते होते. श्रीराम त्यांना सद्गती देवो, मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि अनुयायांच्या दुःखात सहभागी आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गांधी जयंतीदिनी विविध उपक्रम - मंत्री सुधीर मुनगंटीवार

Tue Sep 20 , 2022
सेवाग्राम येथून होणार ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ     मुंबई : जनाजनात आणि मनामनांत राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यादृष्टीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्याच दिवशी ‘हॅलो ऐवजी वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येईल; या अभियानात राज्यातील जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राज्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com