राहुल गांधी यांच्या हिंदू धर्मियांविषयीच्या वक्तव्यावर हिंदू जनजागृती समितीची राष्ट्रपतींकडे कारवाईची मागणी !

नागपुर :- हिंदू जनजागृती समितीने नागपूर जिल्ह्यातील “जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक निवेदन देऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हिंदू समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलीस वरिष्ठ निरीक्षक आसाराम चोरमले यांना हे निवेदन देण्यात आले.” यावेळी चित्तपावन ब्राह्मण संघाचे सचिव उमाकांत रानडे, हिंदू जागरण समितीचे अध्यक्ष गंगाराम नटीये, सर्व भाषिक ब्राह्मण महासंघाचे डॉ. राजेंद्र दीक्षित, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे दिलीप कुकडे, प्रदीप पांडे, महादेव दमाहे, देवकुमार शर्मा, हिंदू जनजागृती समितीचे नागपूर जिल्हा सेवक अतुल आर्वेनला आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी उपस्थित होते.राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे हिंदू जनजागृती समितीने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तत्काळ रद्द करण्याची मागणी केली असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने यापूर्वीही भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवादाची संकल्पना समाजात रुढ करून हिंदू समाजाची नाहक बदनामी केली होती.

हिंदू जनजागृती समितीने राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनात, राहुल गांधी यांनी हिंदू समाजाची सार्वजनिक आणि बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली आहे. समितीने असेही सांगितले आहे की, राहुल गांधी यांनी लोकसभेत घेतलेल्या समभावाने वागण्याच्या शपथेचा भंग केला आहे, त्यामुळे त्यांच्या निवडणुकीसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एसएनडीटी महिला विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र निर्माण करावे - राज्यपाल रमेश बैस

Sat Jul 6 , 2024
– एसएनडीटी महिला विद्यापीठाचा १०९ वा स्थापना दिवस संपन्न मुंबई :- मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. देश-विदेशातील लोक या शहराला भेट देत असतात. महर्षी कर्वे यांनी महिलांसाठी स्थापन केलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने आपली आंतरराष्ट्रीयस्तरावर ‘दृश्यता’ वाढवण्यासाठी एक प्रदर्शन केंद्र तसेच विद्यार्थ्यांसाठी ‘आऊटरीच सेंटर’ निर्माण करावे, अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे केली. अशा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com