शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

– कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन लाभासाठी प्रमाणिकरण आवश्यक

यवतमाळ :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करून घेण्यासाठी दि.30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. लाभासाठी या मुदतीत प्रमाणिकर करणे आवश्यक आहे.

आधार प्रमाणिकरणासाठी महाआयटीच्यावतीने दि.१२ ऑगस्ट ते दि.१८ सप्टेंबर पर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती, तथापि या योजनेमध्ये जिल्ह्यातील १ हजार २५१ शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आधार प्रमाणिकरण केलेले नाही. आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणिकरणाची सुविधा वाढविण्यात आली आहे.

जिल्ह्यातील जे शेतकरी या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र ठरले आहेत व ज्यांना विशिष्ठ क्रमांक देण्यात आला आहे, तथापि ज्यांचे आधार प्रमाणिकरण झालेले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांनी दि.३० सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आपले सरकार पोर्टल प्रभावीपणे राबविण्याबाबत प्रशिक्षण

Fri Sep 20 , 2024
यवतमाळ :- जिल्ह्यामध्ये आपले सरकार पोर्टलची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा शंभर टक्के निपटारा व्हावा यासाठी राज्य शानाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्राचे विशेष संबोधक मुख्य सचिव ऑनलाईन व्हीसीद्वारे सहभागी झाले होते. प्रशिक्षण सत्रात ई-गर्व्हनन्स तज्ञ देवांग दवे व तांत्रिक सहाय्यक विनोद वर्मा यांनी सहभागी कर्मचाऱ्यांना या संदर्भात प्रशिक्षण दिले. सदर विशेष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com