सम्राट अशोकाचे अर्थशास्त्र भारताच्या श्रीमंतीचे होते : डॉ सी पी थोरात 

नागपूर :- आज पासून अडीच हजार वर्षांपूर्वी मौर्य घराण्यातील सम्राट अशोक यांनी जे अर्थशास्त्र राबवले ते भारताला श्रीमंत करणारे होते. म्हणून अशोकाच्या काळात भारत (जंबुदीप) समृद्ध व वैभवशाली देश असून भारतात सोन्याचा धूर निघत असल्याचे बोलल्या जाते. असे मत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील पालीचे अभ्यासक डॉ सी पी थोरात यांनी व्यक्त केले.

डॉ सी पी थोरात यांनी वयाच्या 83 व्या वर्षी सम्राट अशोक यांचे अर्थशास्त्र हे बुद्धिझम मधील आदर्शशास्त्र या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली विभागातून पीएच डी केली आहे. ते आर टी एम नागपूर विद्यापीठातील पाली प्राकृत व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागातील व्याख्यानात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख प्रो डॉ नीरज बोधी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ तुळसा डोंगरे यांनी, सूत्रसंचालन सचिन देव यांनी तर समापन आशा मेश्राम यांनी केले.

कार्यक्रमाला आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंबाझरी तलावात होत असलेल्या प्रदूषणाबाबत एमआयडीसीवर कार्यवाही करा

Tue Sep 12 , 2023
– मनपा आयुक्तांचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निर्देश नागपूर :- अंबाझरी तलावामध्ये प्रदूषणामुळे जलपर्णी वाढत आहेत. यावर आळा घालण्याच्या दृष्टीने तलावात होणारे प्रदूषण रोखण्याची गरज असून त्यादृष्टीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) वर कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. अंबाझरी तलावातील जलपर्णीच्या उगमाचे कारण शोधून ती समूळ नष्ट करण्याच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com